मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि फौजिया खान अर्ज भरणार आहेत. मुंबईतील विधानभवनात ते आपले अर्ज भरतील. राज्यात सात जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यात संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या चार तर भाजपचे ३ उमेदवार निवडून येऊ शकतात.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीच्या चार पैकी दोन जागा राष्ट्रवादी तर शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी एक जागा लढवणार आहे. काँग्रेस आणि शिवसेनेकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाहीत. तर भाजपनंही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.


राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. २६ मार्चला होणाऱ्या या निवडणुकीसाठी १३ मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.


0