मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या महिन्यापासून चर्चेत आहे. त्याला अंमली पदार्थाशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि जवळपास तीन आठवडे त्याने जेलमध्ये घालवले होते. आर्यन खान आता त्याच्या घरी परतला आहे पण ड्रग्ज प्रकरणानंतर त्याच्या आयुष्यात काही मोठे बदल झाले आहेत. यातील काही बदल त्यांच्या पालकांनी स्वतः आणले आहेत तर काही परिस्थितीनुसार.  तर मग जाणून घेऊया आर्यनच्या आयुष्यात ज्या गोष्टी बदलल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. अरबाज मर्चंटशी मैत्री
आर्यन खानला मित्र अरबाज मर्चंटसह अटक करण्यात आली होती. जामिनाच्या अटींनुसार, त्यांनी एकमेकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क ठेवू नये. दोघेही चांगले मित्र मानले जात होते, मात्र ड्रग्ज प्रकरणानंतर त्यांच्या मैत्रीत मोठी दरी निर्माण झाली आहे.


2. मीडियापासून दूर 
स्टार किड असल्याने आर्यन खान नेहमीच मीडियाच्या भोवऱ्यात असतो. मात्र जामिनाच्या अटींनुसार त्याला आता माध्यमांपासून पूर्णपणे दूर राहावे लागणार आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार आर्यनला आता मीडियासमोर कोणतेही वक्तव्य करता येणार नाही. 


3. परदेशात जाऊ शकत नाही
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत होता. मात्र, आता केस संपेपर्यंत त्याला मुंबईबाहेर पडू दिले जात नाही. त्याचा पासपोर्टही एनडीपीएस कोर्टाकडे सोपवण्यात आला आहे.


4. बॉडीगार्ड आणि जीवनशैली
 आर्यन खानबद्दल बातम्या आल्या आहेत की शाहरुख लवकरच त्याच्यासाठी नवीन बॉडीगार्ड नियुक्त करणार आहे. याशिवाय त्यांना तणावातून वाचवण्यासाठी त्याला काही काळ अलिबागच्या फार्महाऊसवर पाठवण्याची योजना आखली जात असल्याचेही वृत्त आहे. याशिवाय त्याच्या आहारात बदल करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींची जबाबदारी स्वतः गौरीने घेतली आहे.