दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : उर्मिला मातोंडकर यांनी कॉंग्रेसला रामराम केला आहे. आपल्या तक्रारीची दखल न घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर उर्मिला मातोंडकर यांनी तत्कालीन मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांना पत्र लिहून आपली नाराजीही व्यक्त केली होती. या पत्रात त्यांनी संजय निरूपम यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. लोकसभेतील आपल्या पराभवासाठी काँग्रेसमधीलच काही नेते जबाबदार असल्याचेही उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले होते. मात्र, मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे हे पत्र उघड झाले होते. यामुळे उर्मिला मातोंडकर प्रचंड नाराज होत्या.