मुंबई: येत्या १ तारखेपासून पश्चिम रेल्वेकडून गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. नवीन वेळापत्रकानुसार लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. याशिवाय, चचर्गेट-विरार लोकलचे काही थांबे कमी करण्यात आले आहेत. तर संध्याकाळच्या वेळेत विरारपर्यंत महिला विशेष लोकल चालवण्यात येईल. 


तसेच गर्दीच्या वेळेनुसार काही गाड्यांचे मार्गही बदलण्यात येतील. संध्याकाळी गर्दीच्यावेळी चर्चगेटहून सुटणारी एखादी जलद लोकल मुंबई सेंट्रलपर्यंत थांबणार नाही. जेणेकरून या वाचलेल्या वेळेचा फायदा जादा फेरीसाठी होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.