मुंबई : उन्हाळ्याचा मोसम सुरु झालाय त्यामुळे इतर कोणतेही रासायनिक द्रव्यपदार्थ घेण्यापेक्षा शहाळे, लिंबूपाणी, कोकम सरबत घेणे नेहमीच चांगले. लिंबूपाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जाऊन शरीर साफ होण्यास मदत होते. दिवसभरात लिंबू पाणी कधीही घेणे चांगले मात्र सकाळी उठून लिंबू पाणी घेणे शरीरासाठी अधिक चांगले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी उठून लिंबूपाणी घेण्याचे हे आहेत फायदे


१. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास लिंबू पाणी घेतल्याने शरीर साफ होते. 


२. लिंबू पाणी शरीरातील पाचक रसांना उत्तेजित करते. यामुळे पाचनक्रिया सुधारते.


३. लिंबू पाण्यात मोठ्या प्रमाणावर व्हिटामीन सी असते. तसेच अनेक अँटी ऑक्सिंडट गुणही असतात. यामुळे त्वचेवरील डाग निघून जातात. 


४. तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असल्यास लिंबू पाण्याने हा त्रास दूर होतो. 


५. लिंबूपाण्यामुळे मुख दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. हे पाणी प्यायल्याने शरीर ताजेतवाने राहते. 


६. लिंबू पाण्यामुळे शरीरातील पीएच लेव्हल कायम राहते. 


७. लिंबू पाण्यात व्हिटामीन सी आणि पोटॅशियम असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. 


८. सकाळी उठल्यानंतर लिंबूपाणी प्यायल्यास दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत होते. 


९. जर तुम्ही वजन कमी करत आहात तर सकाळी उठून लिंबू पाणी पिणे चांगले.