नवी दिल्ली : नारळपाण्यामध्ये अनेक लाभकारक फायदे असतात. आजारी माणसाला नारळपाणी दिले जाते. यामुळे शरीराला उर्जा मिळते. तसेच रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. मात्र नारळपाणी पिण्याची योग्य वेळ कधी याबाबत अनेकदा लोकांमध्ये दुविधा असते. काहींचे म्हणणे असते की नारळपाणी सकाळी प्यावे तर काही म्हणतात नारळपाणी संध्याकाळी पिणे योग्य असते. मात्र तज्ञांच्या म्हणण्यानुसार सकाळच्या वेळेस नारळपाणी पिणे शरीरासाठी लाभदायक असते. सकाळी नारळपाणी प्यायल्यास दिवसभर शरीराला स्फूर्ती मिळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी उठून नारळपाणी पिण्याचे हे आहेत फायदे


थॉयरॉईड हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी नारळपाणी खूप उपयोगी ठरते. 


किडनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नारळपाण्याचे सेवन करणे चांगले असते. तसेच मुतखड्याचा त्रास होण्याची शक्यताही कमी होते. 


नारळपाण्याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. ज्यामुळे रोगांपासून बचाव होतो. 


जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय तर नारळपाणी पिण्याने मोठा फायदा होतो. यात कॅलरीजची मात्रा कमी असते. नारळपाणी प्यायल्याने बराच वेळ भूक लागत नाही. यामुळे सतत खाण्याचीही गरज भासत नाही. 


नारळपाणी प्यायल्याने त्वचेलाही फायदा होतो. त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो.