लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये तिस-या टप्प्यात 69 जागांसाठी सुमारे 61 टक्के मतदान झालं. सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा पाहायला मिळाल्या. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री उमा भारती, केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा, मुलायमसिंह यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, माजी मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल, अपर्णा यादव, रिटा बहुगुणा-जोशी यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिस-या टप्प्यात  12 जिल्ह्यातील 826 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलंय. यामध्ये समाजवादी पार्टी, बसपा आणि भाजपचं वर्चस्व असलेले सात जिल्हे आहेत. लखनऊ, फरुखाबाद, हरदोई, कानपूर ग्रामीण, कानपूर शहर, मैनपुरी, कन्नौज, इटावा, औरिया, बाराबंकी या 12 जिल्ह्यात मतदान झालं.


या मतदानासाठी तब्बल 17 हजार मतदान केंद्र उभारण्यात आली होती.  तिस-या टप्प्यात अडीचशे उमेदवार करोडपती तर 110 उमेदवार हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते.