नवी दिल्ली : सध्याच्या सामाजिक परिस्थितीमुळं हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे. कोणता कायदा सांगतो की, हिंदूंची लोकसंख्या वाढता कामा नये ? इतर धर्मांची लोकसंख्या वाढत असताना हिंदूंना कुणी अडवलंय? असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहन भागवत यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेसह विरोधीपक्षांनीही जोरदार टीका केली होती. या मुद्द्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही भागवतांना लक्ष्य केलं आहे. हिंदूंना भडकवण्याआधी मोहन भागवत यांनी 10 मुलांना जन्म द्यावा आणि त्यांचं चांगलं संगोपन करावं, असं ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.