नवी दिल्ली : आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या मार्गरक्षण पर्यटक वाहनावर घात करत हल्ला केला. ज्यामध्ये 2 जवान शहीद झाले तर अनेक जण जखमी झाले.


आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील सीमेलगत असलेल्या राष्ट्रीय राजमार्ग-53 वर दहशतवाद्यांनी वाहनावर हँडबॉम्ब टाकले. यानंतर म्यानमारलगतची सीमा सील करण्यात आली आहे. यामध्ये 4 वाहनांचं नुकसान झालं आहे. संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.