नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर येथे दहशदवाद्यांच्या सर्च ऑपरेशन दरम्यान ५ जवान शहीद झाले. यामध्ये २३ वर्षीय जवान कॅप्टन पवन कुमार हे देखील शहीद झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहीद पवन कुमार यांनी शहीद होण्याआधी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. ती पोस्ट कदाचित देशातील प्रत्येकाच्या मनाला हेलावून टाकणारी आणि डोळे उघडणारी असावी. 


कॅप्टन पवन कुमार यांनी म्हटलं की, किसी को आरक्षण चाहिए तो किसी को आझादी, हमे कुछ नही चाहिए भाई. बस अपनी रझाई. 


देशात सुरू असलेल्या वातावरणावर आणि त्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना त्यांनी टोला लगावला.  कॅप्टन पवन कुमार शनिवारी चकमकीत शहीद झाले.