राजौरी : सीमारेषेवर पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामध्ये भारताचा एक जवान शहीद झाला आहे. राजौरीभागामध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सुरु असलेल्या गोळीबारात या जवानाला प्राण गमवावा लागला आहे. हा जवान बीएसएफचा असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजौरीबरोबरच मेंढरच्या बालाकोटमध्येही पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरु आहे. या भागामध्ये भारताचे दोन जवान जखमी झाले आहेत, त्यांना उधमपूरमधल्या लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रविवारी रात्रीपासून पाकिस्तानकडून आर.एस.पुरा, राजौरी आणि मेंढरमध्ये गोळीबार करण्यात येत आहे.