नवी दिल्ली : दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी पदाचा राजीनामा दिल्यावर आज सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जंग यांची भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल दुपारी जंग यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता.  राजीनाम्याचं कोणतही विशेष कारण न देता जंग यांनी पद सोडल्यानं दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 


खरंतरं जंग हे मोदी सरकारच्या अत्यंत जवळचे मानले जातात. मग त्यांना अशा प्रकार तडकाफडकी उपराज्यपालपद का सोडावं लागलं याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतंय. त्यात आज सकाळी जंग यांचे कट्टर विरोधक अरविंद केजरीवाल सकाळी उपराज्यपालांच्या बंगल्यावर पोहचल्याने, झालं गेलं सगळं केजरीवाल विसरले की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.