नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचा मासोळी बाजार केलाय अशा शब्दांत सरन्यायाधीश टी.एस.ठाकूर यांनी न्यायालयात गोंधळ घालणा-या वकिलांना फटकारलं आहे. शुक्रवारी नोटबंदी संदर्भातल्या याचिकांवरील सुनावणी दरम्यान ठाकूर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.


ही सुनावणी सुरु असताना काही वकीलांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि ते मोठमोठ्या आवाजात बोलू लागले. यावेळी त्यांच्या या वागण्यावर सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त करत इतक्या गंभीर विषयावर इतकं असंवेदनशीलपणे कसे काय वागू शकता असा सवाल विचारला. गेल्या 23 वर्षांत असं दृष्यं कधीही पाहिलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं.