नवी दिल्ली : शशिकला यांनी बेकायदा संपत्ती जमावल्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आजच्या निकालावरच शशिकला यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. निकाल विरोधात गेला तर त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगणार आहे.


शशिकला यांच्या बाजूने निकाल लागला तर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) शशिकला यांचा मुख्यमंत्रीपदाचा रस्ता मोकळा होईल
२) सरकार स्थापन करण्यासाठी आत्मविश्वास
३) आमदार फुटण्याची शक्यता संपुष्टात येईल
४) जयललितांची जागा शशिकला घेतील
५) विरोधी पक्षांवर दबाव टाकता येईल


निकाल शशिकला यांच्या विरोधात आला तर...


१) ६ वर्षांची शिक्षा होईल
२) मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंग होईल
३) पनीरसेल्वम यांचा गट आणखी ताकदवान होईल
४) भ्रष्टाचाराचा डाग कायमचा बसेल
५) लोकांमध्ये शशिकलाबद्दल विश्वासर्हता राहणार नाही


काय आहे नेमके प्रकरण?


- १९९६ प्रकरण समोर आले
- जयललिता आणि शशिकला आणि दोन नातेवाईकांविरूद्ध गुन्हा
- ६६ कोटीची अधिक संपत्ती असल्याचे उघड
- २७ सप्टेंबर २०१४ मध्ये बेंगलुरू कोर्टाने निकाल सुनावला
- जयललिता आणि शशिकला यांना ४ वर्षाची शिक्षा सुनावली
- १०० कोटींचा दंड करण्यात आला
- अन्य दोन नातेवाईकांना ४ वर्षाच्या शिक्षेवर १० कोटी दंड
- कर्नाटक हायकोर्टात प्रकरण गेले
- हायकोर्टाने ११ में २०१५ मध्ये पुरावे नसल्यामुळे सोडले
- याविरोधात सुब्रमण्यम स्वामी यांनी सुप्रीम कोर्टात अपील केले
- आज अंतिम सुनावणी होईल
- जयललिता आणि शशिकला यांनी अधिक संपत्ती कमावली का हे स्पष्ट होईल.