नवी दिल्ली :  महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या निडणूकीतल्या घवघवीत यशानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची सविस्तर चर्चा सुरू आहे. तब्बल दीड तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.. सूत्रांनी दिलेल्या माहिती महापालिका निवडणूक, जिल्हापरिषद निवडणूक आणि मुंबईच्या महापौरपदाबद्दल मोदी आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चर्चा आटोपून आता मुख्यमंत्री फडणवीस पर्यावरण मंत्रालयाकडे रवाना झालेत. निवडणूकीनंतर प्रथमच दिल्लीत गेलेत. पर्यावरण मंत्रालयातल्या कामानिमित्त मुख्यमंत्री दिल्लीत  आहेत. आता संध्याकाळी मुख्यमंत्री आज दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.