श्रीनगर : दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे आठ जवान शहीद झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीरच्या अवंतिपुरा भागात ही घटना घडलीय. केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) जवान फायरिंग रेन्ज प्रॅक्टिसवरून परतत असताना त्यांच्या बसवर दहशतवाद्यांनी अचानक हा हल्ला केला. 


प्रत्यूत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झालेत. परंतु, या हल्ल्यात सीआरपीएफच्या आठ जवानांनी आपले प्राण गमावलेत तर २४ जख गंभीर जखमी झालेत, असं सीआरपीएफ कमांडन्ट राजेश यादव यांनी म्हटलंय. हा गोळीबार अजूनही सुरू असल्याचं कळतंय.