नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं केलेल्या सर्जिकल ऑपरेशननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच पाकिस्तानला लक्ष्य केलं आहे. भारतानं कधीच दुसऱ्या देशावर हल्ला केला नाही आणि भारत जमिनीसाठी भुकेला नाही, असा टोला मोदींनी पाकिस्तानला लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या आणि दुसऱ्या विश्व युद्धामध्ये भारतानं प्रत्यक्ष सहभाग घेतला नसला तरी या युद्धामध्ये दीड लाख भारतीय जवानांना शहीद व्हावं लागलं, असंही मोदी म्हणाले आहेत. प्रवासी भारतीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय केंद्राचं उदघाटन केलं. यावेळी मोदींनी हे वक्तव्य केलं.