रांची : झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या घटनेचं दादरी हत्याकांडाशी साम्य असल्याचं म्हटलं जातंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रांचीहून जवळपास १०० किमी दूर लातेहार जिल्ह्यात बालूमाथच्या जंगलात आठ म्हशी घेऊन जाणाऱ्या दोन तरुणांना पशु संरक्षण समितीच्या लोकांनी जबरदस्त मारहाण केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी या तरुणाला झाडाला बांधून फासावर लटकावल्याची माहिती मिळतेय. 


अल्पसंख्यांक समुदायाच्या दोन तरुणांना मारहाण करताना त्यांचे हात मागे बांधण्यात आले... आणि तोंडात बोळा कोंबला गेल्याचंही उघड झालंय. 


मृतांची नाव मजलूम अंजारी (३५ वर्ष) आणि आझाद खान (१५ वर्ष) अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत क्रूर पद्धतीनं या हत्या करण्यात आल्यात.


जमावाचं जोरदार प्रदर्शन


या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी जोरदार प्रदर्शन सुरू केलंय. मारेकऱ्यांच्या अटकेची मागणी करत रांची-चतरा मार्ग बंद करण्यात आलाय. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि फायरिंगही करावी लागलीय.