पटना : वडिलांच्या मृत्यूनंतर मुलींनी त्यांचे अंत्यसंस्कार केल्याची वेगळी घटना पटनाच्या गोपाळगंजमध्ये घडली आहे. रुढी परंपराना न जुमानता त्या तीन मुलींनी आपल्या वडिलांना स्मशानभूमीत नेलं आणि त्यांना मुखअग्नी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोपाळगंजच्या किशोर कुमार यांना मुलगा नाही. यामुळे त्यांच्या धाडसी मुलींनी आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्याचं वेगळं उदाहरण प्रत्येकासाठी कायम केलं आहे.


परंपरेनुसार मुखअग्नी देण्याचं कार्य घरचा मुलगा करतो, पण मुलगा नसेल तर नातेवाईक ही विधी करतात. किशोर कुमारच्या मुलींनी त्यांचे अंत्यसंस्कार करुन या परंपरेला नवं रुप दिलं आहे.