वृंदावन : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे भारताला मिळालेलं गॉड्स गिफ्ट (देवाची देण) आहे," अशा शब्दांत त्यांनी मोदींचं कौतुक केलंय. वृंदावन येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या संमेलनात तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मोदी यांच्याकडे देशासाठी खूप चांगल्या योजना असून त्यांची ते अतिशय चांगल्या रितीनं अंमलबजावणी करतील. ते जगात कुठेही जातात तिथं मोदी मोदी अशा घोषणा दिल्या जातात.," असंही शिवराज सिंग चौहान म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. 


जेएनयू प्रकरणावर बोलताना 'काँग्रेस पक्ष म्हणजे महात्मा गांधींचा पक्ष... असं करताना राहुल गांधींना लाज वाटायला हवी,' अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींवर घणाघाती प्रहार केला.'गरीबांचे रक्त शोषणऱ्या काँग्रेसला गरीबांविषयी बोलण्याचा काय अधिकार आहे?' असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना केला. मध्य प्रदेशात भाजप सरकारच्या काळात झालेल्या कामांची माहितीही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली.