नवी दिल्ली : काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आश्वासने तोडणाऱ्यांचे 'पोस्टर बॉय' असल्याचं म्हटलं आहे, एवढंच नाही तर हे सरकार खोटारड्यांचे सरकार असल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसने मोदींना लक्ष्य करताना सांगितले की, मोदींचे सरकार आणि त्यांचे राजकारण हे असत्यावर आधारलेले आहे. ते आश्वासने तोडणाऱ्यांचे पोस्टर बॉय आहेत. 


सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी भारताला आणि जगाला अनेक आश्वासने दिली. पण, आता दोन वर्षातच त्यांचे सत्य जगासमोर येत आहे. मोदींनी दिलेली आश्वासने उघडी पडत आहेत. 


मोदींनी दोन कोटी नागरिकांना नोकरी देणार असे म्हटले होते. पण, प्रत्यक्षात १.३५ लाख नागरिकांनाच नोकरी मिळाली आहे. यूपीए सरकारच्या काळात २०११ मध्ये ९ लाख रोजगार उपलब्ध करून देण्यात आले होते.


काँग्रेसने आपल्या संकेतस्थळावर विविध मुद्द्यांवरून मोदींवर टीका केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्थेची प्रगती होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच दिसत नाही. 


एनएसजी सदस्यत्वावरून चीननेही भारताला तोंडघशी पाडत पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. तरीही तज्ज्ञ श्री मोदींजींच्या परराष्ट्र धोरणाचे गुणगान गात आहेत, अशी खरमरीत टीका करण्यात आली आहे. पठाणकोट, पांपोर, हजारवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन यातून मोदींच्या परराष्ट्र नितीचे पितळ उघडे पडत आहे, असं काँग्रेसने म्हटलंय.