नवी दिल्ली : दसऱ्याच्या दिवशी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'आम्ही काही दिवसांमध्ये आमची ताकद दाखवली आहे. आम्ही जगाला सांगितलं आहे की आम्ही एक मजबूत देश आहे.'
 
राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, 'भारताला डिवचल्याशिवाय तो कोणावरही हल्ला नाही करणार. जर आम्हाला छेडलं तर आम्ही कोणाला सोडणार देखील नाही.'


भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकरनंतर पाकिस्तानला चांगलाच धक्का बसला होता. त्यानंतर पाकिस्तानातून अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना देखील भारतात हल्ला करण्याची योजना आखत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. पण जर पुन्हा भारतात काही घटना घडल्या तर पाकिस्तानला त्याचं चोख प्रत्यूत्तर दिलं जाईल असं देखील पाकिस्तानला ठणकावण्यात आलं आहे.