लखनऊ : नव्यानं अस्तित्वात आलेल्या योगी आदित्यनाथ सरकारच्या पहिल्याच विधीमंडळ अधिवेनाची सुरूवात वादळी झाली आहे. आज राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी विरोधीपक्षाच्या आमदारांनी कागदाचे गोळे फेकले. सभागृह सुरू होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.


सर्वपक्षीय आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी वारंवार शांत राहण्याचं आवाहन केलं. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.  योगी आदित्यनाथ यांचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.