नवी दिल्ली : पाकिस्तानमधला सिंध प्रांत हा भारतात नसल्याची खंत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्याआधी सिंध प्रांत हा भारताचा हिस्सा होता. याच भागात माझा जन्म झाला. पण आता हा भूभाग भारताचा हिस्सा नसल्यामुळे मला दु:ख होत असल्याचं अडवाणी म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिया फाऊंडेशनद्वारा आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अडवाणींनी सहभाग घेतला होता. अडवाणींबरोबर या कार्यक्रमात बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीनाही उपस्थित होत्या. याआधीही अडवाणींनी सिंध प्रांताविषयीचं त्यांचं प्रेम बोलून दाखवलं होतं. सिंध प्रांताविना भारत मला अपूर्ण वाटतो, असं अडवाणी म्हणाले होते.