गांधीनगर : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सहारा कंपनीकडून 2013-14 दरम्यान नरेंद्र मोदींना कोट्यवधींची रक्कम दिली गेल्याचा आरोप राहुल गांधींनी गुजरातमधल्या सभेत केला.


सहा महिन्यांत सहारानं नऊवेळा, मोदींना कोट्यवधी रुपये दिले. आयकर विभागाकडे त्याची नोंद असल्याचं राहुल म्हणाले. या व्यवहारांचं मोदींनी उत्तर देण्याची मागणीही त्यांनी केली.