मुंबई : प्रसिद्ध सिने-दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी ट्विट करत अरविंद केजरीवालवर टीका केली आहे. वर्मा म्हणतात की, 'मला असा वाटयचं की जेव्हा केजरीवाल मफलरमध्ये असायचं तेव्हा ते माकडासारखे दिसतात. पण लष्करावर केलेल्या टीकेनंतर आता खरच असं वाटू लागलं आहे की ते माकड आहेत.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितल्याने त्यांच्यावर देशभरातून टीका सुरु झाली होती. 


राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केलं आहे की, देशाबाहेर सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या लष्कराने देशात अँटी नॅशनल केजरीवालवर ही सर्जिकल स्ट्राइक केलं पाहिजे असं म्हटलं आहे. आप पार्टीचं नाव आता पाप पार्टी केलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.