मुंबई : टाटा समुहाकडून चेअरमन सायरस मिस्त्रींना हटवण्यात आलं आहे. सायरस मिस्त्री यांच्याऐवजी पुढच्या चार महिन्यांसाठी रतन टाटा हे टाटा समुहाचे अंतरिम चेअरमन असतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चार महिन्यांमध्ये टाटा समुहाच्या नविन चेअरमनची निवड होणार आहे. ही निवड करण्यासाठी एक समितीही बनवण्यात आली आहे. या समितीमध्ये रतन टाटा, वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोनेन सेन आणि लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


टाटा आडनाव नसेलेले सायरस मिस्त्री हे टाटा समुहाचे पहिलेच चेअरमन होते. तडकाफडकी सायरस मिस्त्रींना का हटवण्यात आलं याबाबत मात्र अजूनही टाटा समुहाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.