नवी दिल्ली : रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक गुड न्यूज. रेल्वेनं आता तुमची हवाई सफर घडवून आणण्याची तयारी केली आहे. एअर इंडिया आणि आयआरसीटीसीमध्ये झालेल्या करारानुसार रेल्वे तिकीटाच्या दरात तुम्हाला हवाई सफरीचा आनंद घेता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या रेल्वेच्या एसी फर्स्ट क्लासचं तिकीट कन्फर्म झालं नसेल तर काळजी करु नका. कारण तुम्हाला त्या बदल्यात विमान प्रवासाची संधी मिळू शकते. याबाबत एअर इंडिया आणि आयआरसीटीसीमध्ये करार झालाय.


ज्या प्रवाशांकडे राजधानी एक्स्प्रेसचं तिकीट आहे आणि त्या रुटवर एअर इंडियाची विमानसेवा असेल त्याचवेळी या नव्या सेवेचा रेल्वे प्रवाशांना फायदा मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही २४ तासाच्या आत बुकींग करणे आवश्यक आहे.