अनंतनाग : जम्मू काश्मीरमधल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना, भारतीय लष्करानं ठार मारलं आहे. अनंतनाग जिल्ह्यातल्या पेहलगाममधल्या अवूरा गावात रात्रीपासून, दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु होती. एका घरात हे दहशतवादी लपले होते. 


एका व्हिडीओच्या आधारावर हे दहशतवाद्यांचा सुरूवातीला तपास लागला असल्याचं सांगण्यात येत आहे. हा कथित व्हिडीओ काही न्यूज चॅनेल्सने प्रसारीत केला होता. जम्मू -काश्मीरमध्ये सर्वत्र बर्फाची चादर असताना, अशा वातावरणातही सैन्याने दहशतवाद्यांचा धैर्याने सामना करणे सुरूच ठेवले आहे.