गोरखपूर :  बुधवारी रात्री भारत विरूद्ध बांगलादेश यांच्या अत्यंत अटीतटी आणि रंजक सामना झाला तो सामना पाहत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जवळ असलेल्या बेलीपार ठाण्याच्या क्षेत्रातील बिस्टौली गावातील ५५ वर्षीय ओमप्रकाश शुक्ल या व्यक्तीचा मृत्यू झाला. 


आपल्या मित्रांसोबत शुक्ल मॅच पाहत होते. मॅचच्या शेवटच्या षटकात ६ चेंडूत ११ धावा काढायच्या होत्या. तीन चेंडूत ९ धावा झाल्या त्यात दोन चौकार लगावले गेले. त्यावेळी त्यांच्या छाती दुखू लागले. 


 


कुटुंबातील व्यक्तींना काही समजण्याच्या आत ओमप्रकाश यांच्या मृत्यू झाला. ओमप्रकाश यांना तीन मुलं आहे. त्यांचा मोठा मुलगा संतोष बंगळुरूमध्ये काम करतो. दुसरा मुलगा साऊदीला आहे.