इस्लामाबाद : हाफिज सईदने पुन्हा भारतविरोधी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हाफिज हा मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाफिज म्हणतो, भारतावर अणुहल्ला करण्यासाठी पाकिस्तान पूर्णपणे सज्ज आहे. तसेच भारताने पाकवर हल्ला केला, तर आम्ही शांत बसणार नाही. भारतावर न्यूक्लिअर ड्रोनद्वारे अणुहल्ला करण्यात येईल. 


हाफिज एवढंच बोलून थांबत नाही, तो पुढे म्हणतो, पाकिस्तानला आता १९७१ सालचा देश समजू नका. आमची शक्ती आता वाढली आहे.


कोणत्याही प्रकरच्या हल्ल्याचा सडेतोड उत्तर देण्याची तयारी असल्याचे हाफीज म्हणाला. याशिवाय, संपूर्ण भारताला नष्ट करण्यासाठी आमच्याकडे मुबलक न्यूक्लिअर ड्रोन असल्याचंही हाफिज म्हणतो.