नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज ७१ व्या संयुक्त राष्ट्र संघाच्या समिटमध्ये भाषण करणार आहेत. यामध्ये सुषमा स्वराज कांगावखोर पाकिस्तानचा बुरखा फाडणार असल्याचं मानलं जातंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ट्वीट करुन म्हटलं होतं की, भारतसह संपूर्ण जग UNGA मधील भारताच्या व्हिजन डॉक्यूमेंटची वाट पाहत आहे. प्रत्ये जण परराष्ट्रमंत्रीचं भाषण ऐकण्यासाठी उत्सूक आहे. भारताचं अधिक लक्ष्य हे काश्मिर असणार आहे. काश्मिरचा मुद्दा हा विश्व शांतीसाठी चॅलेंज आहे. 


शरीफ यांच्या उद्दाम विधानांचा सुषमा स्वराज खरपूस समाचार घेणार आहेत. पाकच्या दहशतवादी कारवायांचे सबळ पुरावे संयुक्त राष्ट्रसमोर मांडले जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला जागतिक पटलावर एकटं पाडण्याची रणनिती यशस्वीपणे अंमलात आणण्याचा प्रयत्न भारताकडून केला जाणार आहे.