मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने असहिष्णूतेच्या मुद्दयावर केलेल्या वक्तव्यामुळे तो अनेक दिवसांपासून चर्चेत होता. अनेकांनी त्याच्यावर टीका केली. पण तरीही आमिर आपल्या कामात एकाग्र आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत पार पडलेल्या मेक इन इंडियाच्या एका कार्यक्रमात त्याचे पाय चक्क अजय-अतुल यांच्या एका मराठी गाण्यावर थिरकले. मुंबईत आयोजित केलेल्या मेक इन इंडियाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक दिग्गज उपस्थित होते.


हेमा मालिनी यांच्या डान्सने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील या कार्यक्रमात एक कविता म्हटली.