मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान सध्या काही दिवसांपासून एका वक्तव्यामुळे वादात सापडला आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी याचा निषेध देखील केला आहे. आता सलमानच्या या वक्तव्यावर ऐश्वर्या राय बच्चनने देखील प्रतिक्रिया दिली आहे. सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील नातं कोणाला सांगण्याची गरज नाही. ब्रेकअपच्या इतक्या वर्षानंतरही या दोघांच्या जोडीचे आजही अनेक फॅन आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानच्या बलात्काराच्या वक्तव्यावर ऐश्वर्याने त्याच्यावर अप्रत्यक्षपणे टिका केली. तिने रणबीरचं इतकं कौतूक केलं की ती सलमानला कदाचित आवडणारही नाही. ऐश्वर्या आणइ रणबीर ऐ दिल है मुश्किल सिनेमा करतायंत.  ऐश्वर्याने म्हटलं की, रणबीर एक असा अॅक्टर आहे जो तणावाच्या वातावरणातही आनंदीत राहण्याचा प्रयत्न करत असतो. कारण रणबीरचा ह्यूमर चांगला आहे. 


ऐश्वर्याने म्हटलं की, ऋषि कपूरच्या दिग्दर्शनात बनलेल्या 'आ अब लोट चले' या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत काम केलं होतं. तेव्हा त्यांच्यासोबत रणवीरही सेटवर यायचा. 


तुम्हाला माहित असेल की जेव्हापासून रणबीर आणि कॅटरीना रिलेशनमध्ये होते त्यामुळे सलमानला रणवीर आवडत नव्हता. यामध्ये ऐश्वर्याने देखील आता रणवीरचं कौतूक करुन अप्रत्यक्षपणे सलमानवर टीका केली आहे.