मुंबई : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता अक्षय कुमार यानं पुन्हा एकदा आपला हात सैल सोडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना पाटेकर आणि आमिर खान यांच्यानंतर आता अक्षयनं पुन्हा एकदा दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी ५० लाखांची मदत दिलीय.


महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवाय अभियानासाठी ही मदत दिली जाणार आहे. शेततळी तयार करण्यासाठी ही रक्कम वापरली जाणार आहे. 


यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय कुमारचे आभार मानले आहेत. याआधीही, अक्षयनं दुष्काळग्रस्तांना थेट मदत दिली होती.