मुंबई : बीग बी अमिताभ बच्चन यांचं कुटुंब बॉलिवूडच्या आदर्श कुटुंबांपैंकी एक... पण, आता मात्र या कुटुंबातला सुसंवाद हरवल्याचं समजतंय... आणि याला कारणीभूत ठरलाय ऐश्वर्या राय बच्चनचा आगामी सिनेमा... 'ए दिल है मुश्किल'...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन हिनं सहअभिनेता रणबीर कपूरसोबत काही रोमान्टिक सीन्स दिलेत... मात्र, ही गोष्टी बच्चन कुटुंबियांना समजताच त्यांनी याला जोरदार विरोध केला.


इतकंच नाही तर या विरोधानंतर ऐश्वर्यानं स्वत: या सिनेमाचा निर्माता करण जोहरला हे सीन्स हटवण्यास सांगितलंय. 


पहिल्यांदा करणनं हे सीन्स हटवण्यास नकार दिला... परंतु, बीग बींसमोर कुणाचं चालणार? बीग बींनी म्हटल्यावर करणला हे सीन्स हटवणं भाग पडलं.


उल्लेखनीय म्हणजे, याआधीही 'धूम'मध्ये ऋतिक रोशनसोबत ऐश्वर्यानं किसिंग सीन दिल्यानंतर गहजब उडाला होता.