मुंबई : झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला ही मालिका सध्या प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतलीये. निरागस स्वभावाचा राणादा आणि अंजली बाईंच्या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची मोठी पसंतीची पावती मिळतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलेय. या मालिकेत राणाची भूमिका करणाऱ्या हार्दिक जोशीला तर आता राणादा हेच जणू नाव पडलेय. 


या मालिकेत राणा जरी एक पैलवान दाखवला असला तरी त्याचा स्वभाव मात्र निरागस, साधाभोळा असाच आहे. मात्र लवकरच हा राणा आपल्याला खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 


जर्नी प्रेमाची या सिनेमात राणा खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचे समजतेय. मालिकेत निरागस, साधाभोळा राणादा म्हणून प्रेक्षकांनी हार्दिकला आता डोक्यावर घेतले असले तरी त्याच्या खलनायकी भूमिकेला हेच प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.