नवी दिल्ली : टीव्ही सिरीयल बालिका वधूमधील आनंदीची भूमिका साकारणाऱ्या प्रत्युषा बॅनर्जीने शुक्रवारी रात्री गळफास लावून घेत आत्महत्या केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांदिवली येथील तिच्या घरी ती गंभीर अवस्थेत आढळल्यानंतर तिला कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 


२४ वर्षीय प्रत्युषा जमशेदपुर येथे राहणारी होती. अद्याप तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. प्रत्युषा रिअॅलिटी शो बिग बॉस ७मध्येही दिसली होती. 


दरम्यान, प्रत्युषा खूप धीट होती. ती आत्महत्या करु शकत नाही. ही आत्महत्या नाही मर्डर असल्याचे प्रत्युषाचा मित्र एजाज खानने म्हटलंय. रिपोर्टनुसार गेल्या काही दिवसांपासून प्रत्युषा चिंताग्रस्त होती.