मुंबई : 'जिंदगीला रिव्हर्स नाही पण आपण तो टाकला' या टीझरनं प्रेक्षकांचं लक्ष 'ओली की सुकी?' या नव्या चित्रपटाकडे वेधून घेतलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारासाठी उत्कृष्ट चित्रपट आणि पदार्पण उत्कृष्ट दिग्दर्शक या विभागात नामांकने मिळाल्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांत अगोदरपासूनच उत्सुकता निर्माण झालीय. 


निर्माते वैभव उत्तमराव जोशी यांच्या 'नलिनोत्तम प्रोडक्शन' निर्मित हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे. तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले, बालकलाकार चिन्मय संत यांनी यात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.