मुंबई : 'बालिकावधू'फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणात आता आणखीन एक धक्कादायक खुलासा झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओशिवराच्या आपल्या राहत्या घरात फॅनला गळफास लावून घेत प्रत्युषानं आपलं जीवन संपवलं होतं. या प्रकरणात प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राज याला अटक करण्यात आली होती. परंतु, मुंबई हायकोर्टानं त्याला जामीन दिल्यानं सध्या तो तुरुंगाबाहेर आहे. 


परंतु, आता मात्र प्रत्युषानं आत्महत्येपूर्वी आपल्या मोबाईलवरून केलेल्या शेवटच्या कॉल डिटेल्स हाती लागल्याचा दावा फिर्यादी वकील नीरज गुप्ता आणि प्रत्युषाच्या आई-वडिलांनी केलाय.


काय म्हटलं होतं प्रत्युषानं....


या कॉल डिटेल्समध्ये प्रत्युषाच्या शेवटच्या कॉलच्या संभाषणाची माहिती आहे. 'B******d man.. I f**k so hard.. In my life i f**k so hard… for everything… मी इथं स्वत:ला विकायला आलेले नाही... मी इथं अभिनय करायल आलेय... काम करायला आलेय. आणि आज तू मला कुठे आणून ठेवलंयस... राहुल, तुला याची कल्पनाही नसेल की आता मला किती घाणेरडं वाटतंय' असं प्रत्युषानं या संभाषणा दरम्यान म्हटलंय. 


वकिलांच्या म्हणण्यानुसार, या फोन कॉलच्या संभाषणातून राहुल प्रत्युषावर वेश्याव्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती करत होता. तिनं स्वत: आपल्या संभाषणात 'वेश्याव्यवसाय' हा शब्द वापरलाय, असं त्यांनी म्हटलंय.