मुंबई :  टीव्हीची सुप्रसिद्ध कलाकार प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूनंतर सर्व इंटस्ट्री दुःखात बुडली आहे. आत्महत्या करून जीवन संपविणाऱ्या प्रत्युषाच्या आत्महत्येला तिच्या बॉयफ्रेंडला जबाबदार धरण्यात येत आहे. तो सध्या आयसीयूत भरती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुलच्या वडिलांनी मीडियाशी बोलताना सांगितले, मी एका सासऱ्याप्रमाणे आपल्या मुलीला गमवल्याच्या दुःखात आहे. माझा मुलगा ही आता जीवन आणि मृत्यूच्या मध्ये झुंज करत आहे. प्रत्युषाच्या आत्म्याला शांती लाभो आणि माझा मुलगा लवकर ठीक व्हावा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो आहे.


राहुलच्या कुटुंबियांनी सांगितले की, त्याची प्रकृती खूप गंभीर आहे. तो सतत म्हणतो आहे की प्रत्युषा त्याला बोलवत आहे. राहूल सध्या आयसीयूमध्ये भरती आहे. 


राहुलच्या कुटुंबियांना प्रत्युषाला त्रास दिल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, त्यांना तेव्हा माहिती होतं की प्रत्युषाला राहुल त्रास देत होता. मारहाण करत होता. मग त्यावेळीते पुढे का आले नाहीत. आता ती नसल्याने लोक वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. 


राहुलवर उपचार करणारे डॉक्टर एसजी गोयल यांनी सांगितले, पूर्वी पेक्षा त्याची प्रकृती उत्तम आहे. बीपी देखील नॉर्मल आहे. पण काल पासून तो उलटी करत आहे. त्याने जेवण केले नाही तो ३ ते ४ वेळा बेशुद्ध झाला होता. स्ट्रेसमुळे तो कोणाशी बोलत नाही.  लवकरच त्याच्या इलाजासाठी मनोचिकित्सकाची मदत घेणार आहे.