मुंबई: अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं केलेल्या आत्महत्येवर तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्यावर आरोप होत आहेत. या प्रकरणावर अखेर राहुल राज सिंगनं मौन सोडलं आहे. एक एप्रिलला नेमकं काय झालं हे राहुलनं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्महत्या करण्याआधीच्या रात्री मी, प्रत्युषा आणि आमचा एक मित्र मिळून पार्टी केली आणि रात्रभर गप्पा मारल्या. 1 एप्रिलला सकाळी तो मित्र घरी निघून गेला. त्यानंतर आम्ही जेवण बाहेरून मागवायचं ठरवलं, जर त्या दिवशी घरीच जेवण बनवलं असतं, तर प्रत्युषा वाचली असती असं राहुल म्हणाला आहे. 


मी उठलो तेव्हा प्रत्युषा आंघोळीला गेली आणि तिनं दारू प्यायला सुरुवात केली. मी तिला थांबवण्याचाही प्रयत्न केला, त्यानंतर मी जेवण आणायला बाहेर गेलो. 


जेवण घेऊन मी घरी आलो तेव्हा मी बेल वाजवली, पण कोणीच दरवाजा उघडला नाही. मग मी प्रत्युषाला फोन केला, मेसेज केला, तरीही तिचा रिप्लाय आला नाही. 


त्यानंतर माझ्या शेजारी काम करत असलेला नोकर तिथे आला, त्याला मी उडी मारून माझ्या बाल्कनीमध्ये जायला सांगितलं, आणि दरवाजा उघडायला सांगतिलं. मी आत गेलो तेव्हा प्रत्युषा पंख्याला लटकली होती, असा खुलासा राहुनं केला आहे. 


मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, तेव्हाच तिच्या कुटुंबाला ही माहिती दिल्याचं राहुल म्हणाला आहे. मी अडीच तास हॉस्पिटलमध्ये होतो, पण त्यानंतर तिथून निघून गेलो, मी प्रसारमाध्यमांना तोंड देऊ शकत नव्हतो अशी प्रतिक्रिया राहुलनं दिली आहे.