मुंबई : बॉलिवूडमधील अनेक जोडप्यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत आहेत. रणबीर कपूर आणि कतरीना कैफचा ब्रेकअप, फरहान अख्तर-अधुना यांचा घटस्फोट तर अरबाज खान-मलायका हेदेखील विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घटस्फोटाबाबत कुंद्रानेच प्रतिक्रिया दिलेय.


शिल्पा आणि राज नात्यात दुरावा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्यात बिनसल्याचे बोबले जात आहे. शिल्पा आणि राज यांच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज त्याच्या घरी जात नव्हता. तो मुंबईमधील त्याच्या ऑफिसमध्येच राहत होता. यामुळे शिल्पा आणि राज यांच्यात काही तरी मतभेद झाल्याची चर्चा होती.


डीएनए वृत्तपत्राला माहिती


मिस मालिनी या संकेतस्थळाच्या सूत्रांनुसार या सर्व गोष्टी खोट्या असल्याचे समोर आले. त्यानंतर तर आता,  माहीत नाही या सर्व अफवा कुठून सुरु झाल्या अशी प्रतिक्रिया स्वतः राज कुंद्राने झी मीडिया समूहाच्या डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे. राज म्हणाला की, मी गेले काही दिवस ऑफिसच्या कामात खूप व्यस्त असल्यामुळे माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हतो. त्यामुळे शिल्पा तिच्या मैत्रीणींकडे माझ्याविषयी तक्रार करायची बहुदा त्याचवेळी या अफवांना सुरुवात झाली असावी. 


 मला श्वास घ्यायलाही वेळ नव्हता


माझं माटुंग्याला ऑफिस आहे. तेथे मी २० तासांपेक्षाही अधिक वेळ काम करत होतो. खाणं आणि झोपणं सोडाचं पण मला श्वास घ्यायलाही वेळ नव्हता. इतका मी कामात व्यस्त होतो. फक्त आंघोळीसाठी आणि कपडे बदलण्यासाठी मी घरी जायचो. चला निदान राजच्या प्रतिक्रियेमुळे शिल्पाच्या चाहत्यांना तरी दिलासा मिळाला असेल, असो टोला राजने लगावला.