मुंबई : येत्या ५ मार्चला राणादा-अंजली बाईंचा विवाहसोहळा पार पडतोय. या लग्नासाठी जोरदार तयारीही सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे राज्यात  महापालिका आणि जिल्हा परिषदेमधे कोण कोणाला घेऊन सत्ता स्थापन करणार याची चर्चा सुरु असताना राज्यामधे एका लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे ती म्हणजे राणादा-अंजली बाईंच्या लग्नाची. 


राणादा-अंजली यांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापण्यात आल्यात. विवाह मुहूर्त मिती फाल्गुन २ शके १९३८ रविवार ५ मार्च २०१७ रोजी सकाळी ११.३० मिनिटांनी पार पडणार आहे.