मुंबई : ‘#Bandra’ या शिल्पाचं उद्घाटन मुंबईतील वांद्रे परिसरात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या हस्ते करण्यात आले. मात्र, यावेळी चाहत्यांनी एकच गर्दी केल्यामुळे शाहरूखला पाहायला आलेल्या फॅन्समुळे चेंगराचेंगरीची सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्दीतून वाट काढत शाहरूख कसाबसा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचला. या चेंगराचेंगरीत अनेक पत्रकार आणि उपस्थित नागरिक खाली पडले. अखेर 10 मिनिटात त्यानं उद्घाटन उरकलं. मात्र, चाहत्यांच्या गराड्यातून बाहेर पडताना शाहरुखची चांगलीच दमछाक झाली.


शाहरुखचे चाहते आणि भाजप कार्यकर्ते यांनी केलेल्या गर्दीमुळे काही वेळासाठी वाहतूकही खोळंबली होती. या कार्यक्रमाला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजप खासदार पूनम महाजन उपस्थित होत्या.