मुंबई : या वर्षांच्या सुरुवातीलाच अनेक सेलिब्रिटी जोडप्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या धडाधड आदळल्या... आणि या सेलिब्रिटींच्या चाहत्यांना धडकीच भरली. स्टार क्रिकेटर. विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं ब्रेकअपही असंच... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांवर विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. पण, आम्ही तुम्हाला तीन उल्लेखनीय गोष्टी सांगतोय ज्यामुळे तुम्हाला या ब्रेकअपच्या बातम्या खऱ्या आहेत याची खात्री पटेल. 


इन्स्टाग्रामवर 'हार्टब्रेक'


तुम्ही विराटच्या सोशल अकाऊंटवर जरा लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की गेल्या काही दिवसांपासून विराट इन्स्टाग्रामवर जरा जास्तच अॅक्टिव्ह झालाय. नुकतंच काही दिवसांपूर्वी त्यानं एक बावळटपणा केला. 


विराटनं आपला एक सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता... यावर त्यानं लिहिलं होतं 'हार्टब्रेक'... आणि आपली चूक लक्षात येताच त्यानं तातडीनं हा फोटो सोशल वेबसाईटवरून हटवला. 


अनुष्काला केलं अनफॉलो


आपल्या 'हार्टब्रेक'नंतर स्वत:ला सावरून विराटनं लगेच आपली गर्लफ्रेंड अनुष्का कोहली हिला सोशल मीडियावरून अनफॉलो करून टाकलं. 


विराटनं घातलेल्या लग्नाच्या मागणीला अनुष्कानं ब्रेक लावल्यानं विराट नाराज झाला आणि त्यामुळे या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण  झाला, असं म्हटलं जातंय. 


विराटची गुळगुळीत दाढी


तुम्हाला माहीत असेलच की लग्नाच्या वेळी पंजाबी लोकांत दाढी वाढवून ऐट दाखवण्याची सवय पाहायला मिळते. आपल्या लग्नासाठी विराटनं आपली दाढी फॅशनेबल पद्धतीनं वाढवली होती, असं म्हटलं जातंय. 


पण, अनुष्कानं आपल्या करिअरला जास्त महत्त्व देत लग्नाचा निर्णय पुढे ढकलल्याचं लक्षात येताच विराटनं आपली दाढी पुन्हा एकदा गुळगुळीत करून घेतल्याचं समजतंय.