मुंबई: विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यामधलं भांडण तर सर्वश्रुत आहे. सलमान जेव्हा ऍश्वर्याच्या प्रेमात असताना ऍश्वर्याच्या आयुष्यात आला, तेव्हापासून या सगळ्या वादाला सुरुवात झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमाननं आपल्याला फोन करून धमकी दिल्याची विवेकची पत्रकार परिषद चांगलीच गाजली. सलमान आणि विवकेमधला हा वाद अजूनही कमी झालेला नाही. 


आयफाच्या एका कार्यक्रमामध्ये पत्रकारानं विवेकला तु सलमानसोबत पॅच अप करणार का असा प्रश्न विचारला. या आधी विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं विवेकनं दिली, पण हा प्रश्न ऐकताच विवेक तिथून निघून गेला.