सातारा : राज्यात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असून मुख्यमंत्री शिवसेनेच्या मंत्र्यांना कधीही हाकलून देतील, आता सत्तेला सुरुंग लागण्याची केवळ औपचारिकता बाकी असल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय. 


सातारा जिल्ह्यात जातीयवादी पक्षाला  दूर ठेवण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आणि इतर समविचारी आघाड्यांना एकत्र करुन निवडणूक लढवणार असल्याचंही ते म्हणाले...