अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील शेंडी घाटात एसटी बसची मोठी दुर्घटना होताना टळलीय. कोल्हार घोटी महामार्गावर संगमनेर-कसारा बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळं बसवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. 


ऐन घाटाच्या रस्त्यावर अशी घटना घडल्यामुळं बसमधल्या 47 प्रवाशांचा जीव धोक्यात आला. मात्र रस्त्याला लागून क्राँक्रीटचे कठडे असल्यामुळं बस थेट कठड्यावर जाऊन अडकली. त्यामुळं मोठा भीषण अपघात टळला.