औरंगाबाद : धनगर समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आज यशवंत सेनेच्या वतीन मंत्रीमंडळ बैठकीवर भव्य मोर्चा काढण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मोर्चात शेकडो मोर्चेकरी सहभागी झाले होते.


औरंगाबाद शहरातील मिलकॉर्नर भागातून हा मोर्चा काढण्यात येऊन आमखास मैदानावर मोर्चाचा समारोप करण्यात आला.


यावेळी मोर्च्या दरम्यान मोर्चेकरांनी पिवळ्या रंगाचे झेंडे हातात घेऊन हळद उडवत आपल्या मागण्या मांडल्या..


जर आता सरकारनं धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यशवंत सेनेकडून देण्यात आलाय.